20,000 कोटी रुपयांचा मालक कोण ?  काँग्रेसचा पीएम नरेंद्र मोदींना सवाल ?

0
72

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्रित येत आहेत. यादरम्यान, विरोधक विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

यातच आता, काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील कथित संबंधांवर पुन्हा प्रश्न उपस्थित केला.

जयराम रमेश यांनी आरोप केला की, ’28 जानेवारी ते 28 मार्चपर्यंत काँग्रेसने पंतप्रधान मोदींना अदानींबाबत 100 प्रश्न विचारले होते. राहुल गांधी लोकसभेत या मुद्द्यांवर बोलले आणि त्यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले.

हा अदानीचा मुद्दा नाही, तर हा मोदानीचा मुद्दा आहे. अदानींच्या शेल कंपन्यांमधील 20,000 कोटी रुपयांचा मालक कोण, याची आम्हाला कल्पना नाही. खरा मुद्दा पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांचा आहे,’ अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here