कलम ३०२ खुनाच्या गुन्ह्यातून ८० शेतकरी कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता१६ वर्षांच्या संघर्षानंतर शेतकरी आंदोलनाला मिळाले न्यायाचे बळ

0
12

कोल्हापूर, दि. प्रतिनिधी : जानवी घोगळे

शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने पोलिस प्रशासनाच्या मदतीने जाणीवपूर्वक दाखल केलेल्या कलम ३०२ खुनाच्या गंभीर गुन्ह्यातून माझ्यासह एकूण ८० शेतकरी कार्यकर्त्यांची कोल्हापूर सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तब्बल १६ वर्षे चाललेल्या या लढ्याला अखेर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने सर्व शेतकरी आंदोलनकर्त्यांना प्रचंड दिलासा मिळाला असून न्याय मिळाल्याचा जल्लोष न्यायालय परिसरातच पाहायला मिळाला.
‘हा गुन्हा आंदोलन दडपण्यासाठी राजकीय आकसातून दाखल’

त्या काळात शिरोली परिसरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला कमकुवत करण्यासाठी, आंदोलनातील नेतृत्व संपुष्टात आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठी हा गुन्हा जाणीवपूर्वक दाखल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांकडून सातत्याने करण्यात येत होता. न्यायालयाच्या निर्णयाने हे सर्व आरोप खरे असल्याचे अप्रत्यक्षरित्या अधोरेखित झाले.
‘बारा हत्तीचे बळ पुन्हा मिळाले’

निर्दोष मुक्ततेनंतर आंदोलनातील कार्यकर्त्यांनी सांगितले की,
“शेतकरी न्यायहक्कासाठी आणि घामाच्या दामासाठी लढत होता, लढत आहे आणि लढतच राहील. आता आम्हाला पुन्हा बारा हत्तीचे बळ मिळाले आहे.”
१६ वर्षांची न्यायालयीन पायपीट

शिरोली येथे झालेल्या घटनेनंतर सुरुवातीला वडगाव न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग झाले.
गेल्या १५-१६ वर्षांत सर्व शेतकरी कार्यकर्ते सतत कोर्टाच्या चकरा मारत होते. अनेकांच्या जीवनावर, रोजगारावर, कुटुंबांवर याचा मोठा परिणाम झाला. परंतु शेवटपर्यंत न्यायालयावर विश्वास ठेवून सर्वांनी संघर्ष सुरू ठेवला.

न्यायाधीश कश्यप यांच्या कोर्टात सुनावणी

कोल्हापूर सत्र न्यायालयातील न्यायाधीश श्री. कश्यप यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून तपशीलवार सुनावणीनंतर सर्व ८० जणांना निर्दोष मुक्त केले.

निर्णय लागताच न्यायालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी एकमेकांना गळाभेट देत, अश्रू ढाळत, घोषणा देत आनंद व्यक्त केला. अनेकांनी “हा न्याय शेतकऱ्यांचा विजय आहे” असे भावना व्यक्त केल्या.

प्रकरणातील वकील पथकाची महत्त्वाची भूमिका

दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात अनेक वकिलांनी सातत्याने नि:स्वार्थपणे न्यायासाठी लढा दिला.
या प्रकरणातील प्रमुख वकिलांमध्ये
ॲड. ब्रिजेश शास्त्री
ॲड. श्रेणिक पाटील
ॲड. अमेय मकरे
ॲड. सुवर्णभद्र पाटील
ॲड. टी. वाय. जाधव
ॲड. प्रिती चिटणीस
ॲड. ऋषिकेश काकडे
ॲड. ऋषिकेश शास्त्री
ॲड. व्ही. व्ही. डोईजड
— यांचा समावेश असून त्यांनी गुन्हा निराधार असल्याचे न्यायालयात प्रभावीरीत्या मांडले.

१६ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षा, संघर्ष, मानसिक ताण, राजकीय दडपशाही आणि न्यायासाठीच्या अविरत लढाईनंतर आज शेतकरी आंदोलनकर्त्यांना न्याय मिळाला.
या निर्णयामुळे शेतकरी चळवळीला नवीन जोम आणि ऊर्जा मिळाली असून “अन्यायाविरोधात एकजूट” ही भावना अधिक दृढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here