नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नाच्या 5 दिवसानंतर सासरच्यांना बेशुद्ध करुन दागिने, पैसे घेऊन पसार

0
68

उत्तर प्रदेशातील गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका नवविवाहितेने सासरच्या मंडळींना नशा आणणारा पदार्थ देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर वधू दागिने घेऊन पळून गेली होती.

सासरची मंडळी शुद्धीवर आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, खरगुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पांडेपुरवा बेदौरा मार्केटमध्ये ही घटना घडली आहे, जिथे 5 दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर एक नववधू आली होती. तिने सासरच्या लोकांच्या जेवणात नशा आणणारा पदार्थ मिसळून त्यांना बेशुद्ध केलं आणि नंतर सर्व सामान घेऊन पळ काढला. या घटनेत वधूला तिच्या कुटुंबीयांनी आणि एका मैत्रिणीने मदत केल्याचं म्हटलं जात आहे.

तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता आरोपी वधूला पकडण्यात आलं. तिच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. चौकशीत सत्य बाहेर आले आहे.

या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी सांगितलं की, ब्रृजभूषण पांडेचं लखीमपूर येथील एका तरुणीसोबत 17 डिसेंबर रोजी लग्न झालं होतं. 22 डिसेंबरच्या रात्री नववधूने जेवणात काही पदार्थ मिसळून सासरच्या मंडळींना बेशुद्ध केलं. त्यानंतर तिने घरातील सर्व सामान घेऊन पळ काढला. घटनेपूर्वी वधूसोबत चार जण आले होते.

पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. तपासासाठी तीन पथकं तयार करण्यात आली. पोलिसांना त्यानंतर यश मिळालं. नववधू आणि तिच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान नववधू आणि तिचे साथीदार जहर खुरानच्या टोळीतील सदस्य असल्याचे उघड झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here