
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा. कागल :चिमगांव ता. कागल जिल्हा कोल्हापूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी समरजितसिंह घाटगे गटाच्या सौ रेश्मा सुरेश नाईक ( गुरव) यांची बिनविरोध निवड झाली आहे आज सरपंच दिपक यशवंत आंगज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसरपंचपदासाठी सौ रेश्मा सुरेश नाईक (गुरव)यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली यावेळी सदस्य सागर सदाशिव भोई, आनंदा बाबू करडे, आनंदा बाळू चौगले , संजय शिवाजी एकल, सर्जेराव मारूती अवघडे ,सौ स्मिता विश्वास चौगले, सौ सोनाली अजिंक्य एकल, कविता विश्वनाथ करडे, सौ सुलोचना मारुती कांबळे,सौ संगिता लक्ष्मण फराकटे उपस्थित होते.नवनिर्वाचित उपसरपंच रेश्मा नाईक, यांनी सरपंच दिपक आंगज व सर्व सदस्यांचे आभार मानले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाबुराव साठे यांनी काम पाहिले सुचक म्हणून सदस्य आनंदा बाळू चौगले हे होते .