बाजार भोगाव अनुस्क्रूरा मार्ग बनला धोकादायक.खचलेल्या साईट पट्ट्या बनत आहेत अपघाताचे कारण

0
100

कोल्हापूर प्रतिनिधी – सुदर्शन पाटील

कोल्हापूर व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या राज्य मार्गावरील बाजार भोगाव ते अनुसूरा दरम्यानच्या राज्य मार्गावरील रस्त्याच्या साईट पट्ट्या खचल्या असून अरुंद रस्ते व धोकादायक वळणांमुळे हा राज्यमार्ग अपघातांचे कारण बनला आहे.


या मार्गावरती अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून काही दिवसांपूर्वी एसटी बस व दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये एका आरोग्य सेविकेस आपला प्राण गमवावा लागला आहे.

या मार्गावरील साईट पट्ट्या सहा ते नऊ इंचापर्यंत खचल्या असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दोन चाकी, चार चाकी व अवजड वाहनांना कसरत करतच वाहने चालवावी लागत आहेत.


पुणे राजापूर तुळजापूर अक्कलकोट सांगली या ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बस सुद्धा या मार्गावरून धावत असून या रस्त्याचे रुंदीकरण तसेच खडीकरण होणे गरजेचे बनले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here