‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत हर्षदा खानविलकर यांची धमाकेदार एण्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

0
69

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेतील जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु होणार असून मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकल्याचं दाखविण्यात येणार आहे.

गौरी-जयदीच्या पुनर्जन्माची गोष्ट नित्या आणि अधिराजच्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत आता सुप्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची धमाकेदार एन्ट्री होणार आहे.

हर्षदा खानविलकर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत सरपंचाच्या भूमिकेत आहेत. वसुंधरादेवी अहिरराव ही व्यक्तिरेखा त्या साकारताना दिसणार आहेत.

आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि हटके अशी ही भूमिका असणार आहे.या भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या, ‘स्टार प्रवाह वाहिनीने माझ्यावर विश्वास ठेऊन नेहमीच नवनव्या भूमिकांसाठी माझी निवड केली आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत मी साकारत असलेली वसुंधरादेवी ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. आतापर्यंत मी ज्या भूमिका साकारल्या त्यांच्या पेहरावाची नेहमीच प्रशंसा झालीय.

भरजरी साड्या, दागिने ही माझ्या भूमिकेची प्रमुख ओळख बनली असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र मी आता साकारत असलेली वसुंधरादेवी हे पात्र याच्या पूर्ण वेगळं आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here