Kolhapur: राजाराम कारखान्याच्या एमडींना मारहाण; डॉ. संदीप नेजदार यांच्यासह १३ जणांवर गुन्हा

0
89

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एमडी प्रकाश जयसिंग चिटणीस (वय ४९, रा. हुपरी, ता. हातकणंगले) यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी डॉ. संदीप नेजदार यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून डॉ. नेजदार आणि त्यांच्या सहका-यांनी कट करून जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख चिटणीस यांनी फिर्यादीत केला आहे. संशयित हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डॉ. संदीप विलास नेजदार, बबलू विश्वास नेजदार, युवराज बाजीराव उलपे, निशिकांत किसन कांबळे, धनाजी पांडुरंग गोडसे, प्रवीण विश्वास नेजदार, तुषार तुकाराम नेजदार, कौस्तुभ तुकाराम नेजदार, अजित विलास पवार, शिवाजी आंबी, अनंत श्रीहरी पाटील, श्रीप्रसाद संजय वराळे, प्रवीण बाबूराव वराळे (सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यासह अनोळखी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल झाला.

राजाराम साखर कारखान्याचे एमडी प्रकाश चिटणीस हे मंगळवारी (दि. २) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारखान्यातून कोल्हापूरच्या दिशेने येत होते. कसबा बावड्यातील पाटील गल्ली येथे १५ ते २० जणांनी गाडी अडवून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत चिटणीस यांच्या हाताला, छातीला आणि मानेला गंभीर दुखापत झाली. याबाबत त्यांनी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी डॉ. नेजदार यांच्यासह १३ जण आणि अनोळखी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला. राजाराम साखर कारखान्यात सात महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचा पराभव झाला होता. त्या पराभवाचा राग मनात धरून २० ते २५ जणांनी गाडी अडवून जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख फिर्यादी चिटणीस यांनी फिर्यादीत केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here