पुन्हा राडा, राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर ;आता सतेज पाटील गटाच्या राजाराम कारखान्याच्या माजी चेअरमन ना लाठ्या-काठ्यांनी मारहाण, गाड्याही जाळल्या..

0
857

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा.

प्रतिनिधी : चार पाच दिवसांपूर्वी राजाराम कारख्यान्याच्या एमडी यांना मारहाण झाली होती. त्यानंतर आता याच साखर कारखान्याच्या माजी चेअरमना बेदम मारहाण करण्यात आली आहे.राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमावाकडून गाड्याही जाळण्यात आल्या आहेत.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी राजाराम कारख्यान्याच्या एमडींना मारहाण झाली होती. त्यानंतर आता राजाराम साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांना देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत माजी अध्यक्ष सर्जेराव माने जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी जमावाकडून गाड्या जाळत तोडफोड देखील करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वर्चस्व वादातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावातील ही घटना घडली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये मोठा राडा झाला होता. राजाराम कारख्यान्याच्या एमडींना उसाच्या मुद्द्यावरून सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. ऊस कारखान्याला घेऊन जात नसल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली होती. कसबा बावड्यामध्ये हा प्रकार घडला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता माजी अध्यक्षांना मारहाण करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here