धक्कादायक : चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा विहिरीत बुडून मृत्यू कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथील घटना

0
270

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील पिराचीवाडीमधील दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा काल बुधवार दि १७ जानेवारी रोजी विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

आराध्या सुरेश भोसले वय ६ आणि आरोही सुरेश भोसले वय ९अशी त्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आराध्या आणि आरोही वडील सुरेश भोसले यांच्यासोबत शेतामध्ये उसाला पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. सोबत आलेल्या दोन्ही मुलींना वडिलांनी घरी परत जाण्यास सांगितले.

दरम्यान, शेतीला पाणी देऊन झाल्यानंतर मुलींची आईही घरी गेली. मात्र, घरी पोहोचताच दोन्ही मुली घरी पोहोचल्या नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुलींचा शोध सुरु करण्यात आला.

शोध घेऊनही मुली सापडत नसल्याने आई वडिलांचा जीव टांगणीला लागला. शोध सुरु असतानाच विहिरीवर दोन्ही मुलींच्या चपला दिसून आल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here