कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर भामटे गावाजवळ वडाप रिक्षातील प्रवाशाचे शेजारून जाणाऱ्या टेंपोला डोके आपटल्याने तो ठार झाला.

0
63

कोल्हापूर प्रतिनिधी – प्रियांका शिर्के पाटील

कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर भामटे गावाजवळ वडाप रिक्षातील प्रवाशाचे शेजारून जाणाऱ्या टेंपोला डोके आपटल्याने तो ठार झाला. राजेंद्र आनंदा कांबळे (वय ४५, रा. आडूर, ता. करवीर ) असे ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.

हा अपघात सकाळी साडेदहाच्या दरम्यान झाला. अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

अधिक माहिती अशी, राजेंद्र कांबळे हे कामानिमित्त कळेला रिक्षामधून निघाले होते. रिक्षाच्या ड्रायव्हरजवळ बसलेल्या राजेंद्रने थुंकण्यासाठी बाहेर डोके काढले. त्याचवेळी कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रक क्रमांक (एम. एच. ५०, एम. ६४५९) याचा जोराचा तडाखा राजेंद्र यांच्या डोक्याच्या मागील बाजूवर बसला. यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता.

रिक्षा चालक राजाराम जाधव (रा. वाघुर्डे, ता. पन्हाळा) व ट्रक चालक चंद्रकांत आनंदा पाटील (रा. कराड) यांनी राजेंद्रला कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ट्रक चालक व रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत राजेंद्रच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

राजेंद्र हा मूळचा राक्षी गावचा. तो आजोळी मामाकडे लहानपणापासून असल्याने आडूर येथेच स्थायिक झाला. गरीब व कष्टाळू असलेल्या राजेंद्रने मोलमजुरी करत कुटुंबाचा गाडा सुरू ठेवला होता. राजेंद्रच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुटुंबाचा आधारच हरपला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here