दिल्लीला निघालोय, सर्व काही ठीकठाक होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

0
46

कोल्हापूर : मी आता दिल्लीला निघालो आहे. आमच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे सर्व काही ठीकठाक होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवारी सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. इचलकरंजी जवळील कोरोची येथे महिला मेळाव्यामध्ये त्यांनी भाषण करून माणगाव, हातकणंगले आणि पेठवडगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. पेठ वडगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यासाठी मी दौऱ्यावर आलो होतो. माने यांची चांगले काम केले असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

यानंतर दिल्लीला जाणार असल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, होय मी थोड्यावेळाने दिल्लीला जाणार आहे. आमच्यात व्यवस्थित समन्वय आहे. सर्व काही ठीकठाक होईल. एवढेच मोजके बोलून शिंदे सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here