पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवेरा गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

0
184

कागल प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकानजीक तवेरा गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. नवी मुंबईहून जयसिंगपूरकडे निघालेल्या तवेरा गाडीचा अचानक टायर फुटल्याने तवेरा गाडी समोर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या बोलेरो पिकअपला धडकली.

या अपघातात तवेरा गाडीतील एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू जागीच झाला. निखिल श्रीकांत सवाखंडे, प्रियांका निखिल सवाखंडे, शशिकांत यदुनाथ सव्वाखंडे अशी अपघातातील मयतांची नावे आहेत.

अपघातात 4 जण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.तवेरा गाडीचा टायर फुटल्याने अपघात


पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवी मुंबई येथून जयसिंगपूरकडे निघालेल्या तवेरा गाडीचा साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात असणाऱ्या कणसे हुंडाई शोरूम जवळ अचानक टायर फुटला.

टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे गाडी समोर कोल्हापूरकडे निघालेल्या बोलेरो पिकअप टेम्पोला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यात गाडीत प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

अपघात एवढा मोठा भीषण होता की, यामध्ये तवेरा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या हटवण्यात आल्या आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here