कोल्हापूर जिल्ह्यसह कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल.

0
92

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर :माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नेहमीच शर्यतीवर डाव लावतात. जिंकणारा घोडा ते निवडतात, याचा अनुभव बऱ्याच वेळा अनेकवेळा आला आहे. जिगरबाज वस्तादाने कोल्हापूर जिल्ह्या्चे भाजपा ग्रामीण विभागांचे अध्यक्ष समरजिसिंह घाटगे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. निवडणुकीपूर्वी टाकलेले वस्तादाचे डावपेच हसन मुश्रीफ उलथवून टाकणार? राजा विरुद्ध प्रजा अशीच यावेळची निवडणूक होणार आहे. हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक राजकीय अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. समरजितसिंह घाटगे परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे. कुरघोडीच्या राजकारणात कोण बाजी मारणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर महाविकास आघाडीत उत्साह, तर महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी भक्कमपणे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे. तर महायुती बॅकफूटवर गेली असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीचे हसन मुश्रीफ, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर यांना रोखण्यासाठी राजकीय डावपेच आखले जात आहेत.आपल्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीच्या मागे नेतेमंडळी का लागली आहेत. अशी मिश्किल टिप्पणी केली, निवडणुकीत कोण नायक आणि खलनायक आहे, हे सिद्ध होईल. राजा विरुद्ध प्रजा अशीच निवडणूक होईल असे स्पष्ट केल्याने वातावरण तापले आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संघर्ष अधिक प्रखर होत चालला असून, कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात समरजिसिंह घाटगेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यामुळे हसन मुश्रीफांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.राधानगरी मतदारसंघात अजित पवार गटाबरोबर गेलेले माजी आमदार के. पी. पाटील यांची घरवापसीची वाट सुकर झाली आहे. आपण अजित पवार गटात गेलोच नव्हतो, असे सांगत ते ठाकरे गटाच्या माध्यमातून महाविकास आघाडीतून लढू इच्छित आहेत. त्यांचे मेहुणे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी रीतसर काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. भाजपचे राहुल बजरंग देसाई यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत महाविकास आघाडीच्या कोट्यातून निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. यात कोण बाजी मारणार? याचा फैसला तिकीट वाटपात होणार आहे.घाटगे यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने कागलमध्ये गैबी चौकात हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शरद पवार यांनी भाजपच्या समरजित घाटगे यांच्या माध्यमातून दंड थोपटले आहेत. गतवेळेपेक्षा यंदा मुश्रीफ यांना तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. घाटगे हे भाजपातून महाविकास आघाडीत आल्याने आघाडी अंतर्गत राजकीय मैत्रीची समीकरणे भक्कम होणार आहेत. अनेक मतदारसंघांत साटेलोटे एकमेकांच्या पथ्यावर पडणार आहे.शरद पवार यांचे अत्यंत जवळचे, एकनिष्ठ असलेले हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांची साथ धरली. तेव्हापासूनच हसन मुश्रीफ यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी समरजित घाटगे अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्थता हेरून शरद पवार यांनी व्ही. बी. पाटील यांच्या माध्यमातून त्यांना आपल्या गोटात खेचून आणले. घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश जिल्ह्याच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरला आहे.कागलचे पडसाद कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमटणार आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील दुसऱ्यांदा निवडणूक लढवतील. या मतदारसंघातील अनेक गावे घाटगे यांच्या शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत असतात. कागल उत्तर भागात पाटील यांचा राजकीय प्रभाव आहे. त्यामुळे घाटगे-पाटील या दोघांना एकमेकांची मदत पूरक ठरेल.कागल विधानसभा मतदारसंघात गडहिंग्लज तालुक्याचा बराचसा भाग आहे. गडहिंग्लज तालुक्यातील दोन्ही दिवंगत आमदारांच्या कन्यांच्या राजकीय प्रभावाचा फायदा समरजितसिंह घाटगे यांना होऊ शकतो. जनता दलाचे दिवंगत अध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या, माजी नगराध्या स्वाती कोरी, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर यांची मदत महत्त्वाची ठरू शकते. चंदगड, राधानगरीत ऐनवेळी महाविकास आघाडीकहून नवा चेहरा आखाड्यात उतरवून वस्ताद राखून ठेवलेला डाव टाकणार का?अशी देखील जोरदार चर्चा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here