
प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी आजवर जीवघेणे ठरलेले आहेत. पण कोल्हापुरातील कसबा बावडा येथील ६५ वर्षीय व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीला डॉक्टरांनी १६ डिसेंबर रोजी मृत घोषित केलं होतं. घरी सर्व पाहूणे जमले, अंत्यविधीची तयारी झाली, त्यानंतर रुग्णालयातून घरी अंत्यसंस्कार करण्यासाठी नेत असताना अचानक या व्यकतीची हालचाल होत असल्याचं समजलं. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उलपे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होते. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका अचानक स्पीड ब्रेकर आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंगाचा पुनर्जन्म झाला. कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पांडुरंग उलपे यांचे नातेवाईक घरी जमा झाले. अंत्यविधीची तयारी झाली. रुग्णालयातून पांडुरंग उलपे यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरमुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला. त्याच वेळी पांडुरंग उलपे यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. नातेवाईकांनी पांडुरंग उलपे यांना पुन्हा रुग्णालयात नेले. आणि आज पांडुरंग उलपे आपल्या पायावर उभे राहून घराकडे चालत आलेत. ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईक सांगत आहेत.नेमकं काय घडलं होतं?सोळा डिसेंबर रोजी पांडुरंग उलपे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पत्नी बाळाबाई उलपे त्या ठिकाणी आल्या, तेव्हा पांडुरंग उलपे घामाघूम झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावलं. त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं. रात्री साडे अकरापर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते; पण अखेर त्यांनी उलपेची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. काही मिनिटांतच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहचली आणि जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी त्यांच्या घरी जमले. सर्वांनी पांडुरंग उलपे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली.दरम्यान, रूग्णालयातून ॲम्ब्युलन्समध्ये उलपेना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आलं. नातेवाइकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात रूगणवाहिका मधून नेण्यास सांगितले. तेथे पांडुरंग उलपे यांच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले.पांडूरग उलपे यांच शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देताना दिसले. उलपे शुद्धीवर आले आणि पंधरा दिवसांच्या उपचारानंतर पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले. सोमवारी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.