
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
हुपरी-कोल्हापूर या राज्यमार्गावर मोठया प्रमाणात वाहतुक असून तो सरळ मार्ग कर्नाटकात जात असल्याने, त्या रोडला अवजड वाहनासह मोठी वाहतुक असून उचगांव परिसरात राज्यमार्गाला गतिरोधक/रमलर बसविण्यात यावेत. उचगांव मधुन बाहेर पडताना सरळ कोल्हापूरला जात असताना पलिकडील बाजुस जावे लागते व कोल्हापूरहून येणारी वाहने ही भरधाव वेगाने येत असल्याने तेथे छोटे मोठे अपघात होत असतात. कालच उचगांव मधील रमेश राठोड हा कोल्हापूरला जात असताना भरधाव येणाऱ्या आरामबसला धडक लागुन त्याचा जागीच मृत्यू झाला. हा रहदारीचा भाग असल्याने येथे उचगांवच्या दोन्ही बाजूस हुपरी-कोल्हापूर रोडला गतिरोधक/रमलर करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या रोडवरील भरधाव वाहनांची थोडी गती कमी होवून त्यावेळी उंचगांवमधील कोल्हापूरला जाणारी वाहने ही त्या बाजुस जावू शकतात तरी तातडीने उचगांव परिसरात गतिरोधक किंवा जाड स्वरूपाचे रमलर तातडीने करणे गरजेचे आहे तसेच योग्य त्या ठिकाणी सूचना फलक लावावेत त्यामुळे अनेक अपघात होण्यापासून थांबू शकतात अशी करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे.
या मागणीची निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. एस. बी. इंगवले, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग करवीर यांना देण्यात आले..
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघात होऊ नयेत यासाठी रमलर किंवा गतिरोधक तसेच वेगमर्यादेचा दिशादर्शक फलक बसवण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करून घेऊन ते तात्काळ बसवून घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले..
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, माजी युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, फेरीवाले संघटना तालुकाप्रमुख कैलास जाधव, फेरीवाले संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, रामराव पाटील, आबा जाधव, अजित पाटील आदी उपस्थित होते..

