आता पार्सल होणार नाही खराब’ ; सणासुदीच्या तोंडावर भारतीय टपाल विभागाकडून खास भेट…

0
79

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

मुंबई : टपाल विभागाकडून पाठवलेले पार्सल खराब होणार नाही यासाठी भारतीय टपाल खात्याकडून टपालधारकांसाठी खास भेट देण्यात आलीय. आता इथून पुढे टपाल विभागातून बुकिंगसाठी येणाऱ्या ग्राहकांना पार्सल पॅकिंगची सुविधा देण्यात येणार आहे.

भारतीय टपाल विभागाने सुरु केलेल्या या सुविधेमुळे टपाल खात्याला खूप मोठा फायदा होणार आहे. जनरल पोस्ट ऑफिस म्हणजेच जीपीओ ऑफिसमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा ग्राहकांच्या खूप पसंतीस पडत असून विभागाच्या उत्पन्नही वाढले असल्याची माहिती टपाल खात्याच्या अधिकाऱ्याने दिली.

तसेच या सुविधेसाठी देशातील इतर विविध जीपीओ कार्यालयात व्यवसाय पार्सल केंद्र सुरू करण्यात आले आहे. पार्सल पॅकिंगची नवीन सुविधा देणारा एक विशेष काउंटर येथे बसवण्यात आला आहे. त्या बदल्यात विभागाकडून नाममात्र शुल्क ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here