‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार? झोया अख्तरची मोठी हिंट

0
89

जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. 2011 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची कहानी प्रत्येकाच्या हृदयाला भिडली अन् चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुराळा उडवला होता.

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा सिक्वेल येणार अशी चर्चा सुरू आहे. यावर दिग्दर्शिका झोया अख्तरने मौन सोडले आहे.

एएनआय या एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले, ‘या चित्रपटाची माझ्या हृदयात खूप खास स्थान आहे. सर्वांना तो चित्रपट आवडतो. यात अभिनेत्यांनाही रस आहे आणि आम्हालाही रस आहे.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सीक्वलसाठी चांगली गोष्ट मिळाली तर आम्ही तो नक्कीच बनवू’. त्यामुळे आता चाहत्यांनी झोया अख्तरचे हे वक्तव्य ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेलबाबतची मोठी हिंट असल्याचं म्हटलं जात आहे.

झोया अख्तर दिग्दर्शित ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटात हृतिक शिवाय फरहान अख्तर, कतरिना कैफ आणि कल्की कोचलिन मुख्य भूमिकेत दिसले होते. . तीन मित्रांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट चाहत्यांनी खूप आवडला होता.

या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. यापुर्वी अभिनेता फरहान अख्तरनेही ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सिक्वेलवर पोस्ट केली होती. हृतिक रोशन, अभय देओल यांनी देखील फरहानच्या पोस्टवर कमेंट केल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चा सिक्वेल पहायला मिळणार अशी चर्चा सुरु झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here