‘मी द्वेष करावा इतकीही त्याची लायकी नाही’; सलमानवर भडकले अभिजीत भट्टाचार्य

0
63

बॉलिवूडमध्ये सलमानच्या मैत्रीचे जितके किस्से रंगले आहेत त्याच्यापेक्षा कैकपटीने त्याचे वादविवाद चर्चिले गेले आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत सलमानने पंगा घेतला आहे. यामध्येच २०१५ मध्ये प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet bhattacharya) आणि सलमान (salman khan) याच्यात वादाची ठिणगी पडली.

सलमानच्या हिट अँड रन केसनंतर अभिजीतने त्याच्यावर ताशेरे ओढले होते. इतकंच नाही तर सलमान पाकिस्तानी गायकांना पाठिंबा देतो असा आरोपही केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अभिजीतने सलमानवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ‘तो माझ्या द्वेषाच्या लायकीचाही नाही’, असं त्याने म्हटलं आहे.

अभिजीतने ‘सेलिब्रेनिया स्टुडिओज’ला एक मुलाखत दिली असून त्याची ही मुलाखत सध्या चर्चिली जात आहे. या मुलाखतीमध्ये त्याने सलमानवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत. “मला अजिबात वाटतं नाही की तो माझ्या द्वेषाच्याही लायकीचा आहे. सलमान फक्त त्याच्या गुडवीलमुळे यशस्वी झाला. त्यामुळे तो देव नाही आणि त्याने स्वत:ला देव समजूही नये”, असं अभिजीत म्हणाला.

अभिजीतने या मुलाखतीमध्ये सलमानने कोणत्या पाकिस्तानी गायकांना पाठिंबा दिला त्या गायकांची नावं घेण्यास नकार दिला. मात्र, त्याने अरिजीत सिंगऐवजी राहत फतेह अली यांची निवड केल्यावर भाष्य केलं.

पुढे तो म्हणतो, “हे फार लज्जास्पद आहे. अरजीत या देशातला सगळ्यात मोठा गायक असून त्याने कधीही सलमानसोबत जुळवून घेण्याची विनंती करु नये. त्याऐवजी त्याने थेट सलमानकडे पाठ फिरवायला पाहिजे.”

दरम्यान, सलमान आणि अरजीत यांच्यातला वाद फार जुना आहे. सलमानने त्याच्या एका सिनेमात अरजीत सिंगला गाण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र, त्यानंतर या दोघांमधील वाद मिटलाही होता. अलिकडेच अरिजीतने सलमानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटातील एक गाणं गायलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here