कागल तालुक्यातील चिमगांव येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या समर्थचा आकस्मित मृत्यू साऱ्यांच्या मनाला चटका लावून गेला.

0
370

23 ऑगस्ट 2023: चिमगाव/ कागल: येथील कु समर्थ बाजीराव तिळवे याचा बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 दुपारी 12.30 वाजता आकस्मित मृत्यू झाला. आज सकाळी समर्थचे आई-वडील औषध फवारणी करणे करीता शेतीकडे गेले होते . तर बहीण अनुष्का मुरगूड येथे खाजगी क्लासेस साठी येथे गेली होती . घरी समर्थ एकटाच होता त्याला अस्वस्थ वाटू लागले तेव्हा त्याला ताबडतोब मुरगूड येथील खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले.तर पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. समर्थ मुरगूड येथील शिवराज विद्यालय मध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता.
अत्यंत शांत, मनमिळाऊ समर्थच्या एकाएकी जाण्याने तिळवे कुटुंबियांना धक्का बसला असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अल्पवयीन समर्थच्या अचानक निघून जाण्याने संपूर्ण चिमगांव गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here