कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱ्यामध्ये वेदगंगा नदीत बुडून चौघांचा दुर्देवी अंत!.

0
270

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कागल : कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱ्यामध्ये वेदगंगा नदी पात्रात चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज १७ मे २०२४ रोजी घडली.
या मधील जितेंद्र विलास लोकरे वय ३६, रा. मुरगूड, रेश्मा दिलीप यळमल्ले वय ३४ रा. अथणी कर्नाटक, सविता अमर कांबळे वय २७, रा. रुकडी या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले आहे, तर हर्ष दिलीप यळमल्ले वय १७, रा. अथणी याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. यामध्ये जितेंद्र विलास लोकरे यांची बहिण, बहिणीची मुलगी आणि मामाच्या मुलीचा मृत्यू झालेल्या मध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here