
कोल्हापूर प्रतिनिधी: पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ला मध्ये निरपराध नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारतीय सैन्यदलाने थेट पाकिस्तानमध्ये धडक देत दहशतवादी तळावर हल्ले करत दहशतवादनाने नेस्तनाबूत केलं आणि… हम भी कुछ कम नही ..हे सांगत भारतमातेचा गौरव पुन्हा उंचावर नेला… खरंतर सैन्य दलाचे हे विलक्षण धैर्य धारिष्ट असून भारताची जनता नव्हे तर आज जग सुद्धा भारतीय सैन्यासंबंधित अभिमानीत झालेल आहे.

या सैन्यदलाच्या चोख प्रत्युत्तराबद्दल आणि दहशतवादाचा कंबरड मोडल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याकडून ताराराणी चौकामध्ये जनतेला साखर पेढे वाटण्यात आले.

यावेळी शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख श्री अरुण बुधवडकर शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजय चौगुले श्री वैभव उगले श्री सुनील शेंद्रे सह संपर्कप्रमुख श्री विजय देवणे आणि इतर उपस्थित होते.





