शेतकऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान झाले आहे. सणासुदीपूर्वीच सरकारने त्यांच्यावर गिफ्टचा पाऊस केला आहे. कोणत्या आहेत या योजना?

0
114

20 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर गिफ्टचा वर्षाव केला आहे. सणासुदीपूर्वीच मोदी सरकराने काही योजनांचे गिफ्ट कास्तकारांना दिले आहे. देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची नव्याने सुरुवात करण्यात आली आहे.

या सेवा त्यांना ऑनलाईन पण घेता येतील. केंद्र सरकारचे हे पाऊल देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या (Schemes For Farmers 2023) जीवनात आनंद आणेल, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षण करण्यासाठी मदत करेल, असे मानण्यात येत आहे.

या चार योजनांविषयी केंद्र सरकारने घोषणा केली आहे. कोणते बदल होत आहेत शेतकऱ्यांच्या जीवनात..

केंद्र सरकारने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवारी 19 सप्टेंबर 2023 रोजी या सेवेचा शुभारंभ केला. नवीन दिल्लीत दोन पोर्टल सुरु करण्यात आले. यामध्ये एक शेतकरी कर्ज पोर्टल आहे.

किसान ऋण पोर्टलमुळे (Kisan Rin Portal) शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज मिळेल. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही. त्यांना या पोर्टलचा फायदा होईल. शेतकरी, आधार क्रमांकाच्या आधारे या योजनेत नोंदणी करु शकतात.

शेतकऱ्यांना स्वस्त व्याज दरावर कर्ज घेता येईल. शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज परतफेड केल्यास त्यांना सबसिडीचे गिफ्ट मिळेल. हे पोर्टल शेतकऱ्यांशी संबंधीत डेटा विस्तृत स्वरुपात समोर येईल. या पोर्टलवर कर्जाचे वितरण, व्याजावरील सवलत, योजनेचा फायदा, बँकांसोबतची संलग्नीकरणाची माहिती मिळेल.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. त्याला केसीसी इनिशिएटिव (KCC Initiatives) असे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या योजनेची माहिती दिली.

शेतकऱ्यांना मदतीसाठी बदलासह नवीन योजना आणण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

3 : घर-घर केवायसी (Door-to-Door KCC)

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, किसान क्रेडिट कार्डचा फायदा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने घर-घर केवायसी (Door-to-Door KCC) मोहिम हाती घेतली आहे.

आता केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना किसान क्रेडिट कार्डची माहिती देईल. लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेत सध्या दरवर्षी शेतकरी 6 हजारांची आर्थिक मदत मिळवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here