कसबा बावड्यात पाठलाग करून कोयत्याने वार, 10 ते 15 जणांच्या गटाचा हल्ला करून पलायन

0
164

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : शहरातील कसबा बावड्यात 10 ते 15 जणांच्या गटाने पाठलाग करून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दोघे तरुण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी हल्ला करून पलायन केले.

पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली आहे. सूरज बाळकृष्ण कांबळे (वय 24, रा. आंबेडकरनगर) आणि वैभव विश्‍वास माजगावकर ( वय 27, रा. गोळीबार मैदान) अशी जखमी झालेल्याची नावे आहेत.

बावड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ हा हल्ला झाला. जखमींवर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू आहेत. जखमींनी संशयितांची नावे पोलिसांना दिली आहे. पोलिसांकडून शोध सुरू झाला आहे.पाठलाग करून कोयत्याने हल्ला


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आंबेडकरनगर परिसरातील आंबेडकर उद्यानात काही तरुणांची मारामारी केली होती. त्याठिकाणी सूरज कांबळे उभा होता. त्यावेळी सदर बाजारमधील चार ते पाचजण हातात चाकू, कोयत्यासह घेऊन उद्यानात आले.

त्यांनी हल्ला करण्यासाठी सूरजकडे धाव घेतल्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाठलाग करून हल्ला करण्यात आला. सूरजच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर वार झाले आहेत. हल्ला होताना त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या वैभववरही हल्ला करण्यात आला.

हल्ला करून हल्लेखोर पळाले


हल्ल्याची घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. दुचाकीवरून जखमींना तत्काळ ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. सूरज कांबळेवर 5 ते 6 वार झाले आहेत. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वैभववर सुद्धा वार झालेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here