स्वाभिमानी शेतकरी संघटना आजपासून साखर वाहतूक रोखणार

0
95

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये तातडीने द्या, अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २ (आक्टोंबर) रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांवर ढोल बजावो आंदोलन करून जागर करण्यात आला होता .

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना सावकर मादनाईक म्हणाले की, गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत.

साखर कारखान्यांना यामधून चांगल्या पध्दतीने नफा मिळालेला आहे.वाढलेल्या महागाईमुळे औषधे, खते, बि बियाणे, किटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

वाढलेल्या या महागाईमुळे शेतकयांचे कंबरडे मोडले आहे. तोंडावर दसरा आणि दिवाळी आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे सणासुदीला पैसे नाहीत.

यामुळे कारखान्याकडून तातडीने दुसरा हप्ता ४०० रूपये खात्यावर जमा करण्यात यावे. या बाबत आपणास २ ऑक्टोंबर पर्यत मुदत देण्यात आली होती.

आज अखेर आपण सदरचा हप्ता जमा न केल्याने ढोल ताशा आंदोलन करून कारखानदारांना जागं करण्याचे काम करत असल्याचे सावकार मादनाईक म्हणाले.

आज (३ ऑक्टोबर) पासून कारखान्यातून बाहेर पडणारी साखर वाहतूक अडवून उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असेही ते म्हणाले.

तसेच दसऱ्याच्या अगोदर आमच्या हक्काचे ४०० रूपये प्रतिटन न दिल्यास तुमची दिवाळी गोड होणार नाही.

असा इशारा सावकर मादनाईक यांनी दिला.यावेळी गुरूदत्त, जवाहर, पंचगंगा व शरद यासह राजाराम कारखान्यावर ढोल बजाओ आंदोलन करून ४०० रूपये तातडीने देण्याची मागणी करण्यात आली.

याचबरोबर सांगली जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांवर स्वाभिमानीच्यावतीने निवेदन देत आंदोलन करण्यात आले. यावेळी विठ्ठल मोरे, वैभव कांबळे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, सचिन शिंदे, बंडू पाटील, भिमगौंडा पाटील, सागर मादनाईक, वासू भोजणे, विश्वास बालिघाटे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here