गोरेगांव दुर्घटना आगीने वेढलं, पर्यायच उरला नव्हता; चिमुरड्या लेकराला शालीत गुंडाळून जीवाची पर्वा न करता बाप इमारतीबाहेर धावला आगीत होरपळून ७ जणांचा मृत्यू

0
101

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

मुंबई: मुंबईच्या गोरेगाव परिसरातील समर्थ सृष्टी या पाचमजली इमारतीला आज शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली.

या आगीत होरपळून ७ जणांचा मृत्यू झाला, तर २५ ते ३० रहिवाशांची प्रकृती गंभीर आहे.

या सगळ्यांवर सध्या कुपर रुग्णालय आणि एचबीटी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

ही आग पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास लागली. यावेळी इमारतीमधील बहुतांश रहिवाशी साखरझोपेत असल्याने आग तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरेपर्यंत कोणालाही थांगपत्ता लागला नाही.

अखेर स्फोटासारखा आवाज झाल्याने काही रहिवाशांना जाग आली आणि त्यांनी इतरांना तातडीने सावध केले.

यानंतर इमारतीमधील रहिवाशांची जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु झाली.

गोरेगावमध्ये इमारतीला आग; अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आगीने तिसरा मजला गाठला, सहा जणांचा होरपळून मृत्यू! गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, सहा जणांचा मृत्यू; ५० जण अत्यवस्थअग्निशमन दल याठिकाणी पोहोचेपर्यंत इमारतीमधील रहिवाशी जमेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.

यापैकी एका प्रत्यक्षदर्शीने अंगावर शहारे आणणारी कहाणी सांगितली. या रहिवाशाने आगीची धग वाढताच जीवावर उदार होऊन आगीतून मार्ग काढत आपल्या लहान मुलाला आणि कुटुंबीयांना वाचवले. त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही झोपलो असताना आजुबाजूच्या लोकांनी दरवाजा ठोठावून आग लागल्याचे सांगितले.

आम्ही तातडीने बाहेर आलो. मात्र, आगीच्या धुरामुळे त्याठिकाणी श्वास घेणेही अवघड झाले होते.

त्यामुळे आम्ही पुन्हा घरात येऊन आग विझण्याची वाट पाहत होतो. मात्र, आग वेगाने पसरत वरच्या मजल्यापर्यंत आली.

तेव्हा आम्ही घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मग मी मुलाच्या अंगावर शाल पांघरून मिळेल त्या मार्गाने कुटुंबीयांसह खाली आलो.

येथून बाहेर पडताना आगीच्या झळांमुळे संबंधित रहिवाशाचा चेहरा अनेक ठिकाणी होरपळला.

मात्र, वेळीच हिंमत दाखवल्याने या सगळ्यांचे प्राण वाचले.आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी काही रहिवाशांची प्रकृती गंभीर आहे.

त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये कपड्याच्या चिंध्या ठेवण्यात आल्या होत्या.

या चिंध्यांना आग लागली आणि ते वेगाने पसरत गेली. सर्वप्रथम पार्किंगमधील सर्व गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

या सर्व वाहनांची आगीत राख झाली. त्यानंतर कपड्यांना लागलेल्या आगीचा काळा जाडसर धूर वरच्या मजल्यांवर वेगाने पसरला. हा धूर नाकातोंडात गेल्यामुळेच अनेक रहिवाशांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here