स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद..!

0
135

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर :आज २३ नोव्हेंबर ऊस दर प्रश्नी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन होत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

या ठिकाणी तावडे हॉटेल जवळ शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी मोठी गर्दी केली असून पंचगंगा नदी पुलावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here