धक्कादायक :कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू

0
65

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा

वेंगुर्ला : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील अवधूत हरिभाऊ जोशी वय (३९) यांचा शिरोडा वेळागर समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अवधूत जोशी हे मित्र व कुटुंबीयांसह कोल्हापुरातून शिरोडा खागर येथे समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अवधूत जोशी यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

यावेळी उपस्थितानी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत जोशी हे पूर्ण दिसेनासे झाले होते. यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. सोबत गेलेल्या मित्र व कुटुंबातील सदस्यांनी स्थानिक नागरीकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

याबाबत सिद्धार्थ मधुकर लोखंडे यांनी वेंगुर्ला पोलिसांत खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार गजेंद्र भिसे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here